' *🚩🚩एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’..🚩🚩*
*🚩💥जिथून सुरुवात संघर्षाची तिथून सुरुवात मराठा क्रांतीची.* मराठा समाजातील सर्व समाज बांधवांना माता-भगिनींना कळकळीची विनंती आहे. *🔴आपण आता सध्या आरक्षणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. इथं पर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट त्याग आणि बलिदान दिलेली आहेत. या बलिदानाचा विसर कुणीही पडू देऊ नका.* कारण संघर्ष करणारी मराठा समाजाच्या रक्तामध्ये असेल तरीसुद्धा *💥शांततेमध्ये जेवढी ताकद आहे* ती ताकद कधीही वाया जाऊ देऊ नका. सध्या सर्व 💥 *समाज बांधवांनी ज्या बांधवांना गरज आहे अशा सर्व बांधवांना मदत करणं अनिवार्य आहे.* आता सध्या सरकारनी दिलेला वेळ आज संपत आहे 💥 *आरक्षणासंदर्भामध्ये आज काय निर्णय होतो. याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच.* पण जोपर्यंत पुढील रणनीती ठरत नाही, तोपर्यंत शांततेचा सहकार्य करण्यात यावं असं आवाहन दादा वेळोवेळी करत आहेत त्यांच्या विनंतीला मान देऊन सगळ्यांनी शांतता बाळगायचे आहे कारण *💥शांतता एक अस हत्यार आहे ज्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की समोरच्याला नामोहरण करण्यासाठी शब्दांची सुद्धा गरज भासत नाही.* फक्त शांत रहा संयमी राहा *💥आपापसातले वैचारिक मतभेद अजून सुद्धा जर कुणाच्या मनामध्ये असतील तर ते काढून टाका.* कारण हा मराठा समाज एकत्रित आलेला आहे. ही ताकद दिवसेंदिवस वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणं, हे प्रत्येक समाज बांधवांचे कर्तव्य आहे. आणि ती 💥*ताकत दिवसेंदिवस वाढत राहावे यासाठी सदैव तत्पर असणे गरजेचे आहे,* त्यासाठी जनजागृती अभियान, अखंड चालू ठेवण्यासाठी प्रत्येक समाजबांधवांची गरज आहे त्यासाठी *🔴संघटनात्मक बांधणी आवश्यक आहे.* ती कशा पद्धतीने करता येईल याकडे सर्व समाज बांधवांनी लक्ष द्यायचं आहे ही विनंती.💥🚩🚩🚩